Friday, 29 September 2017

अनादी... अनंत... लडाख...


आजकाल आपण अनेकवेळा फिरायला कुठे कुठे जात असतो. देशात,परदेशात. जास्त पर्यटक जात नाहीत अशा अनवट ठिकाणी जाण्याचाही ट्रेंड आहेच. जम्मू काशमीरमधला लडाख परिसर मात्र खूप पर्यटक जात असले तरी अनवट असा आहे. इतर पर्यटनाच्या ठिकाणी जाणं आणि लडाखला जाणं यात फरक आहे. जे लडाखला जाऊन आले असतील ते माझ्याशी सहमत होतील. मनाला भुरळ घालणारं निसर्ग सौंदर्य भारतात कितीतरी ठिकाणी आहे. लडाखला सुद्धा निसर्गाचं वरदान आहे पण त्या पलीकडे इथे अस काही आहे की जे आपल्या मनाच्या तळापर्यंत पोचतं. इथले उंचउंच डोंगर, नद्यांची लांबरुंद  पात्रं, डोंगररांगातून सरसरणारे रस्ते, आकाशातून भुरभुरणारं बर्फ मनातले अनेक कोपरे ढवळून काढत असतात. महाराष्ट्रात राहिलेल्या मी सह्याद्रीसारखा जुना  पर्वत जवळून पाहिला आहे,अनुभवला आहे. हिमालयाची उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यातली वेगवेगळी रूपं पाहिली आहेत . पण लडाख परिसरातल्या हिमालयाच्या काराकोरम पर्वतरांगा वेगळीच जादू घेऊन वर्षानुवर्षे उभ्या आहेत. उत्क्रान्तीच्या प्रवासात हिमालय हा तुलनेने नवीन पर्वत आहे.  तो एकाच वेळी अवखळ आहे आणि  धीर गंभीरही आहे. त्याची ही दोन्ही टोकाची रूपं लडाखमध्ये अनुभवायला मिळतात.  डोंगरातून वाट काढत गाडी जात असते तेव्हा या अचाट आणि अवाढव्य डोंगराची भीती वाटते तशी त्यांची   भुरळही पडते . मनात येत राहातं शेकडो हजारो वर्षांपासून हे डोंगर इथे असतील. कशाकशाचे  साक्षीदार असतील. या डोंगरातून दूरवर जाणारे रस्ते बांधणाऱ्या माणसांच्या चिकाटीचे साक्षीदार असतील, इथल्या कठीण हवामानात  तग धरून राहाणाऱ्या माणसांच्या चिवटपणाचे साक्षीदार असतील. निसर्गाच्या वेगवेगळ्या कारामतींचे साक्षीदार असतील. हे डोंगर कापत वेगाने खळखळणाऱ्या नद्यांचे साक्षीदार असतील, या  नद्यांमुळे फुललेल्या जीवनाचे साक्षीदार असतील. या नद्यांना या डोंगरांनी सामावून घेतलं तसं माणसांनी बांधलेल्या रस्त्यांनाही घेतलंच  की सामावून . या डोंगररांगांवर नांदणारी शांतता पण बोलकी असते. शांतता बोलकी कशी असू शकते? असते.  शांतता बाकी सगळे कोलाहल संपवते. आपल्यालाच आपल्याशी बोलायला लावते. आपल्याला प्रश्न विचारते. आपल्या जगण्याविषयी आपल्या अस्तित्वाविषयी. एरवी न जाणवणारे बरेचसे आतले आवाज या शांततेच्या  निमित्ताने ऐकायला येऊ लागतात. आपण कोण आहोत, नक्की काय करतो आहोत, काय करू शकतो , काय करू शकलो असतो  असे  प्रश्न ही शांतता आपल्यापुढे सहज उभे करते. ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवतानाही हीच शांतता सोबत असतेच.





डोंगरांगातून रस्ता कापत पॅंगॉंग लेकला आपण जातो तेव्हा सगळ्या लडाख ट्रीपचा सर्वोच्च बिंदू आपण गाठतो. तुम्ही यापूर्वी कितीही निसर्गसौंदर्य पाहिलं असलं तरी याच्या दर्शनाने तुमची बोलती बंद होणार यात काही शंकाच नाही. ते निळंशार अस्तित्व तुम्हाला नक्की नम्र करणार. क्षणाक्षणाला बदलणारे त्याचे रंग आपल्याला आपल्याच मर्यादा जाणवून देतात. कितीही उत्तम कॅमेरा तुमच्याकडे असला तरी ही जादू पूर्णतः आपल्या कॅमेऱ्यात साठवता येत नाही. एका मर्यादेपलीकडे आपण त्या कॅमेऱ्याच्या तावडीत राहूच शकत नाही. मैलोन्मैल   पसरलेला तो लेक कसा आणि किती साठवावा मनात असं वाटत राहातं. त्या पाण्याने   कुठची कुठची आणि केव्हा केव्हाची   प्रतिबिंब साठवली असतील. किती वर्ष हे पाणी असं इथेच असेल. म्हटलं तर प्रवाही म्हटलं तर तिथल्यातिथेच . काय असेल आजुबाजुच्या डोंगराचं आणि या पाण्याचं नातं ? या डोंगरांचे पण किती अवतार या पाण्याने पाहिले असतील? या डोंगराची किती रूपं या पाण्याने दाखवली असतील? काय असेल या डोंगराचं या पाण्याचं प्रयोजन? माणसाला जिथे पोचणं कठीण आहे आणि राहणं तर त्याहून कठीण आहे अशा या ठिकाणी येण्याचा माणसाचा तरी अट्टाहास का? कुठची जादू माणसाला इथे  ओढून आणत आली आहे? माणसाचं आणि निसर्गाचं अनादी आणि अनंत असं हे नातं आहे का? त्या पाण्याचं ते विविधरंगी अस्तित्व आपल्याला काय सांगत असतं ? बदल आणि बदलांची अपरिहार्यता? मानवी आयुष्याची क्षणभंगुरता पण एकूणच अस्तित्वाची अनादि आणि अनंत अवस्था? लडाख आपल्याला प्रश्न विचारतो तसे त्याची उत्तरं शोधायला पण मदत करतो. काही गाठी इथे आल्यावर सुटतात पण काही नवीन गाठी इथे आल्यावर बसतातही. आणि या बसलेल्या गाठी  सोडवण्यासाठी पुन्हा इथेच यावंसं वाटत राहातं 
  




Wednesday, 13 September 2017

आप भी आ जाओ यही पे....


मी नुकतीच लडाख परिसरात ८ दिवस फिरून आले. यात काय विशेष असं एखाद्याला वाटू शकतं. विशेष काही नसलं तरी एक थोडीशी वेगळी गोष्ट अशी की मी आणि माझ्या मैत्रिणी गेलो होतो ८ दिवस फिरायला. आमचे कोणाचेही कुटुंबीय नव्हते आमच्या बरोबर. आणि आमची मुलंही काही वयाने फार मोठी नाहीत. म्हणजे त्यांच्या शाळा, अभ्यास अशा  जबाबदाऱ्या त्यांच्या वडील आणि आजी आजोबांवर सोपवून आम्ही गेलो. ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. जायचा प्लॅन तर मी जोशात केला. जसजसे जायचे दिवस जवळ यायला लागले तसा थोडा जीव वर खाली व्हायला लागला. मुली शाळेच्या बससाठी वेळेवर जातील  ना, योग्य दिवशी योग्य युनिफॉर्म घालतील ना, छोटी  मुलगी ८दिवस राहील का माझी आठवण ना काढता अशा अनेक चिंता मला सतावत होत्या. पण बरेच पैसे खर्च करून विमानाची तिकीट काढली होती, हॉटेलची बुकिंग झाली होती त्यामुळे मागे फिरणं शक्य नव्हत. माझ्या सार्वत्रिक चिंतेचा भाग म्हणून मी माझ्या ११ वर्षाच्या मुलीला म्हणाले, मी तुमचा ८ दिवसांचा मेनू लिहूनच ठेवू का? माझया मुलीचं उत्तर, " मम्मा, त्यापेक्षा तू जाऊच नकोस " अशा स्पष्ट उत्तराने मला अचानक बळ मिळालं ८ दिवस घरापासून लांब जाण्याचं. 

मुंबई दिल्ली आणि दिल्ली लेह असा विमान प्रवास. मुंबई दिल्ली विमान प्रवासाचं काही नावीन्य नव्हतंच. दिल्लीला लेहच्या विमानात   बसल्यावर १५ मिनिटातच बाहेर जे दृश्य दिसायला लागलं त्याने  संपूर्ण ट्रीपमध्ये जे काही अनुभव येणार होते त्याची झलकच मिळाली. सर्वसाधारणतः आपण विमानातून जातो तेव्हा सगळे डोंगर बरेच खाली आणि विमान अगदी उंचावर अशी परिस्थिती असते. इथे मात्र खिडकीतून जरा बाहेर डोकावल की हिमालयाच्या लांबच लांब रांगा दिसत राहातात.  आपल्याला भेटायलाच आल्या असाव्यात इतक्या जवळ. विमानाच्या लँडिंगची ज्यावेळी घोषणा होते तेव्हा तर मजाच येते. आता हे विमान कुठे आणि कस उतरणार असंच वाटायला लागतं. डोंगराच्या रांगा संपतच नसतात. कुठे सपाटी दिसतच नसते. अचानक आपलं विमान एका डोंगराला ओलांडत आणि एकदम लेहचा डोंगर रांगांनी वेढलेला परिसर दिसायला लागतो. 

लडाख परिसर पर्यटकांच्या रडारवर येण्याचं मुख्य कारण म्हणजे आमीर खानचा प्रसिद्ध चित्रपट थ्री इडियट्स. या चित्रपटात आपण फुंगसूक वांगडूची निसर्गरम्य परिसरातली आगळी वेगळी शाळा बघितली. पेंगोंग लेकच्या काठावर स्कुटरवरून येऊन आमीर खानच्या गळ्यात पडलेली करीना कपूर बघितली. त्यामुळे गेल्या काही वर्षात खूप पर्यटक इथे यायला लागले आहेत.  मी पण  त्यातलीच एक  पर्यटक.   लडाखवर निसर्गाचा  वरदहस्त आहे.  जिथे नजर जाईल तिथे पर्वतांच्या रांगाच रांगा पसरलेल्या दिसतात. काहींवर बर्फ, काही रिकामेच. आकाशाचा निळा रंग म्हणजे भुलवणारा निळा. चित्रांमधून असतात तशा नेमक्या छटा. प्रत्येक क्षणाला बदलणारे पॅंगॉन्ग लेकचे रंग तर थोड्याच वेळात आपल्याला आपला कॅमेरा बाजूला ठेवायला भाग पाडतात. ही निसर्गाची किमया आपण कितीही प्रयत्न केला तरी पूर्णपणे एखाद्या माध्यमात साठवून ठेवू शकत नाही , ती याची देही याची डोळा बघितली पाहिजे, अनुभवली पाहिजे. 

इथलं आयुष्य सोपं नाही. आपण कधीतरी फिरायला म्हणून जातो तर आपल्याला इथली थंडी हवीहवीशी वाटते. पण वर्षाचे सहा महिने जबरदस्त गोठवणारी थंडी , बर्फामुळे रस्ते बंद पडतात, वीज नसते, अन्नधान्य भाजीपाला मिळत नाही. प्यायच्या स्वच्छ पाण्यापासून ते विजेपर्यंत सर्वच गोष्टी कठीण होतात . अशाही परिस्थितीत इथली माणसं एकमेकांना धरून जगत राहातात, तगत रहातात, लढत रहातात. लडाखमधल्या अगदी छोट्याशा गावात जरी तुम्ही गेलात तरी समोरून येणारा माणूस विशेषतः बायका अगदी हसून तुम्हाला , "जुले " म्हणणार. जुले म्हणजे लडाखी भाषेतले नमस्ते. लडाख मधल्या सगळ्या बायका मला फार कामसू आणि तरीही प्रसन्न दिसल्या. सकाळी लवकर जवळच्या  गावातून ताज्या भाज्या, फळं घेऊन येणाऱ्या बायका असू देत,  लेहच्या स्थानिक मार्केटमध्ये गरमागरम मोमोज किंवा लडाख स्पेशल बटर चहा विकणाऱ्या बाया असू देत चेहेऱ्यावर हसू आहेच. तुमच्याशी प्रेमाने बोलण्याची तयारी आहे. या बायांच्या आणि  माझ्या आयुष्यात कितीतरी तफावत होती पण जेव्हा त्या उत्साहाने म्हणायच्या, दीदी ये बटर चाय  पिके देखो , गरम मोमोज खाके देखो तेव्हा सगळी अंतर सांधली जायची. त्या उत्साही बायांकडून आम्ही मोमोजची पाककृती सुद्धा शिकून घेतली. 

   लेहच्या मार्केटमध्ये आम्ही सगळ्यांनी  एका बाईकडून जरदाळू (Apricot) घ्यायचे ठरवले. तेव्हाची तिची धावपळ आणि लगबग मनात खूप काही हलवून गेली. एकाचवेळी २०-२५ किलोचा माल विकला जाणार या कल्पनेने तिला आनंद झालाच असणार. पण एवढ्या ८-९ जणींना त्या एप्रिकॉटसाठी बॉक्स हवे होते. आता एवढे बॉक्स एकाचवेळी आणायचे कुठून? तिने पटापट जवळच्या दुकानातून बॉक्स मिळवले,त्यात आमचा माल भरला. तिच्याकडून माझा बॉक्स घेताना माझ्या मनात आलं , वर्षातून किती वेळा तिला असा  आनंद  मिळत असेल ? 


लडाखमधल्या अती उंचावरच्या आणि जेमतेम दोन गाड्या   एकावेळी जाऊ शकतील अशा रस्त्यांवरून प्रवास हासुद्धा एकप्रकारचा साहसी अनुभव आहे. ड्राएवरची थोडीशी  जरी चूक  झाली तर सगळं समाप्त  !   एका बाजूला उंचच उंच पर्वत आणि दुसऱ्या बाजूला भोवळ आणणारी दरी अशा रस्त्यांवरून तासनतास गाडी चालवायची हे  सोपं काम नक्कीच नाही. या रस्त्यांवरून जाणाऱ्या गाडयांचेही काही ठरलेले प्रोटोकॉल आहेत. रस्ते इतके छोटे आणी दगडधोंड्यानी भरलेले असतात की ड्राएवर लोकांनी एकमेकांशी सहकार्य केलं नाही तर गाडया अडकूनच पडतील तासनतास. एखाद्या अगदीच चिंचोळ्या रस्त्यांवरून दोन्ही गाडया सुखरूप पार पडल्या की दोन्ही ड्राएवर मान डोलावून किंवा हात हलवून एकमेकांना पसंतीची पावती देणार. कधी कधी रस्त्याची कामं चालू असतात. रस्ता सपाट करण्यासाठी रोलर फिरत असतो. त्याचं काम पूर्ण होईपर्यंत त्याच्या दोन्ही बाजूच्या गाडया थांबून रहाणार. अशावेळी मग समस्त ड्राएव्हर मंडळींना १५-२० मिनिटांची उसंत मिळते. मग त्यांच्या एकत्र येऊन शिळोप्याच्या गप्पा. मला उगाचच कुतूहल वाटायचं की ह्या ड्राएव्हर मंडळींच्या गप्पांचे विषय काय असतील. गाडीत बसलेल्या, शहरातून आलेल्या , सर्वस्वी वेगळी जीवनशैली असणाऱ्या माझयासारख्या लोकांच्या आयुष्याबद्दल यांना कुतूहल वाटत असेल का? आम्हाला आमच्या संपूर्ण ट्रीपसाठी मिळालेला ड्राएवर झाकीर हा आमचा प्रवासातला मोठा आधार होता. गाडी तर तो उत्तम चालवायचाच पण त्याला आजूबाजूच्या परिसराची फार चांगली माहिती होती. आमचे घरदार हजारो किलोमीटर मागे सोडून आम्ही काही बायकाच फिरायला आलो होतो. आम्हाला आमच्या सुरक्षेची काळजी जशी होती तशी ट्रिपचा आनंद मनमुराद लुटण्याची पण इच्छा होती. मध्येच कुठेतरी गाडी थांबवून फोटो काढावेत किंवा नुसतंच निसर्गसौंदर्य अनुभवावं असं आम्हाला वाटायचं त्या प्रत्येक वेळी झाकीर न कंटाळता गाडी थांबवणार. आम्ही विचारलं , यहाँ थोडी देर के लिए रुक सकते है ? की त्याचं उत्तर, जरूर रुक सकते है.आपल्या देशात योग्य स्वच्छतागृह मिळणं हे एक आव्हानच आहे. लडाखमधले प्रवास खूप मोठे वाटेवर क्वचितच काही चहा, नाष्ट्याच्या टपऱ्या. एखादा असा स्टॉप चुकला तर बराच वेळ काहीही मिळत नाही. लांबच्या प्रवासात ठराविक वेळानंतर  जिथे बऱ्यापैकी स्वच्छतागृह असेल अशाच ठिकाणी गाडी थांबवायची ही शिस्त झाकीरने  सगळ्या ट्रीपमध्ये पाळली. त्याची या बाबतीतली संवेदनशीलता आम्हाला फारच भावली. लडाखच्या त्या नितांत सुंदर परिसरात असताना मधूनच मुंबईच्या चुकार आठवणी यायच्या. लडाखमधले ते मुक्त मोकळे दिवस संपवून परत एकदा मुंबईच्या साचेबद्ध आणि घुसमटवणाऱ्या जगात परत जाण्याचा विचारही नको वाटायचा. अशाच एका भावनाविवश क्षणी आम्ही झाकीरला म्हटलं , " आप तो नसीबवाले हो जो इतनी खूबसूरत जगह मे रहते हो " श्रीनगर किंवा मनालीच्या पुढे कधीही न गेलेल्या त्याचं उत्तर होतं , " आप भी आ जाओ यही पे  "  त्याचं उत्तर अगदी सहज आलेलं होतं. आम्ही काही गहन प्रश्न विचारला आणि त्याने त्याचं विचारपूर्वक उत्तर दिलं असा प्रसंगच नव्हता तो. तरी त्याचं सहज आलेलं उत्तर खूप लोडेड होतं. त्याच्या  रौद्र तरीही नितांत सुंदर निसर्गाच्या सानिध्यातल्या आयुष्याचं ते सहज सार होतं. आमच्या सगळ्या जीवनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं होतं. प्रश्नांची उत्तरं सोपी असू शकतात याची हळूच जाणीव करून देणारं होतं. 





Tuesday, 5 September 2017

My first ever romance with water....



let me get it clear right in the beginning...I am extremely scared of water! my heart was beating fast when I was listening to the instructions before our river rafting . I was surrounded by a bunch of enthusiasts who loved rafting, who kept telling me that its indeed a big enjoyment,no need to worry. Yeah, there was no way they could hear my heart beating faster, they couldn't  see the butterflies flying in my stomach. 

And I still got onto a raft for rafting in Zanskar river near Leh. Before boarding the raft, we got detailed instructions about dos and donts. At the end of those instructions , I was convinced that I would simply kick and shout if I fall in that cold water!lolz, I wouldn't remember any dos and donts.
with a heavy heart and shaking legs, I boarded a raft along with my friends. I was telling myself, everything will be fine, I wouldn't get drowned, I wouldn't fall off the raft! We start moving in our raft. I see a huge water flowing in front of me. Karakoram ranges of Himalayas overpowering us from both the sides! sheer view of cold water soothes my nerves immediately. Cool and shrill air in Himalayas give me the confidence of wading through those waters. 


And comes my first challenge! our raft is about to ride waves  of whats called rapid!Gosh, you have no moment to think or to get scared. You simply ride those waves going up and down. Cold waters of Zanskar splashing all over your body . You neither have  time to notice a deep gorge forming in your abdominal cavity nor time to notice your shaking hands and legs. For me the moment of riding on that first rapid is a liberation. The moment my raft rides that rapid, giving me no time to feel my fear, my romance with water starts! I feel the cold waves of Zanskar lapping up my raft,my paddle,my face,my hair. The stiff body breaks the barriers of fear and flows with the river. Just when I have managed to survive the first rapid in my rafting journey  I see a small kayak sailing through the water.This very kayaker is going to keep me safe in the river. Seeing him sail through those waves is a sheer beauty. Fluid movements of the kayak and pleasure on the face of the kayaker makes you fall in love with rafting. Gives you the confidence to paddle through those waters. Mind you, the kayaker is fun to be with, you ask for a splash from him and he is more than willing to gift you a freezing cold water splash with his paddle! 


My first splash came even before I realized its coming! And then I realized the pleasure and excitement of it. A person who had incredible fear of water is shouting and demanding a splash! In the entire rafting journey, I did enjoy a few splashes from our kayaker. The force with which the splashes came on us, reminded me of what kayaker said right in the beginning, Water is my passion as well as profession. 

My rafting ends where Zanskar and Indus river meet, at The Sangam. I see waters of different colours meeting each other. I saw a passion sailing on water.  On the shore I see a professional helping us to get out of rafts and quickly move to the warmth of our vehicles. Kayaker's words keep ringing in my mind, Water is my passion as well as profession. 










अनवट पर्यटन- दागशाई

  एखादा मोठा विकेंड असेल तर फिरायला जाता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं दिल्लीच्या जवळपास आहेत. शिमला,जयपूर,नैनिताल,मसुरी, ऋषिकेश,लॅन्सडाऊन हि  ...